महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग; १५ टेन्ट जळून खाक

महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज आज लागली आहे. प्रयागराज येथील सेक्टर २२ मध्ये ही आग लागली असून या आगीत १५ टेन्ट जळून खाक झाले आहेत. सध्या अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र, अद्यापपर्यंत आग आटोक्यात आलेली नाही.