इथेनॉल साठी गुऱ्हाळ घरांना परवानगी द्या …
सांगली, दि. 01 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इथेनॉल निर्मितीमध्ये In ethanol production गुऱ्हाळघरांना केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. तसे झाल्यास ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. साखर उद्योगाच्या आधीपासून याभागात गुऱ्हाळघरे अस्तित्वात आहेत. मोडकळीस आलेल्या या गुऱ्हाळ उद्योगास त्यामुळे पुन्हा नवी उभारी मिळणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी MP Raju Shetty यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या संदर्भात निवेदन दिले. साखर उद्योगात साखर, अल्कोहोल, वीज निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे. या ठिकाणी साखरे ऐवजी इथेनॉल निर्मिती करण्यात यावी अशा सूचना केंद्र सरकारने वेळोवेळी दिल्या आहेत. अल्कोहोलमध्ये अधिक पैसे मिळत असल्यामुळे येथे इथेनॉल निर्मितीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
इथेनॉलला अधिक मागणी आल्यावर त्याचा विचार करता येईल, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. खेड्यापाड्या गुऱ्हाळघरात गुळ तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीची संधी प्राप्त होणार आहे. तसे झाल्यास बायोडिझेल व इथेनॉल निर्मितीला चालना मिळणार आहे. त्याच्या साह्याने ट्रॅक्टर व शेती अवजारे चालवता येणे शक्य होणार आहे.
ML/KA/PGB
1 July 2022