चरबीपासून तूप बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त
![चरबीपासून तूप बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2024/01/Screenshot-2024-01-03-165128-801x560.png)
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : म्हैस आणि रेडयाच्या चरबीपासून तूप तयार केले जात असल्याचे समोर आले असून, ते अत्यंत धक्कादायक आहे. या खुलाशानंतर, या हानिकारक प्रथेला जबाबदार असलेल्या कारखान्यावर छापा टाकून तो उद्ध्वस्त करण्यात आला आहे. त्यामुळे भिवंडी महापालिका प्रशासनाने स्थानिक भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
म्हशीच्या चरबीपासून तयार करण्यात आलेल्या तुपाचा विविध खानावळी आणि हॉटेल्सना पुरवठा सुरू होता. भिवंडी महापालिका प्रशासनाला याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानं पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी आपत्कालीन विभागाच्या पथकासह या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात म्हशीच्या चरबीपासून बनवण्यात आलेल्या तुपाचे डबे आणि तूप बनवण्याच साहित्य जप्त करण्यात आलं. पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. A factory for making ghee
ML/KA/PGB
3 Jan 2024