मंत्रालय प्रवेशद्वारावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिक हैराण

मुंबई, दि 4
महाराष्ट्र राज्याच्या गाडा ज्या ठिकाणावरून हाकला जातो ते मंत्रालय आता पाण्याखाली गेले आहे. पहिल्याच पावसात पावसाने झोडपल्यामुळे मंत्रालयाचे प्रवेशद्वार पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे नागरिकांना मंत्रालयात ये जा करणे फार जिकरीचे झाले आहे. या साचलेल्या पाण्याचे डबके मध्ये रूपांतर झाल्यामुळे या ठिकाणाहून वाट काढणे फार त्रासदायक झाले आहे. तर महिलांना इथून चालणे देखील फार मुश्किल झाले आहे. मंत्रालयात संपूर्ण दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. तर वयोवृद्ध नागरिक देखील आपल्या कामासाठी येथे येत असतात. तसेच हे साचलेले पाणी अंगावर उडून कपडे खराब होण्याचे प्रकार देखील वारंवार घडत आहेत. अनेक तक्रारी केल्या परंतु हे पाणी काही निचरा होत नाही अशी माहिती मंत्रालयात नेहमी येणाऱ्या नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितली. तरी या ठिकाणी पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी मंत्रालयात ये जा करणारे नागरिक आणि कर्मचारी करत आहेत.