खाद्यतेलाचे दर लवकरच होणार कमी

नवी दिल्ली, दि. ३ : केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमती ५ ते १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, देशांतर्गत तेल शुद्धीकरण उद्योगालाही यामुळे चालना मिळणार आहे. आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबिन, सुर्यफूल आणि पाल्म ऑइलसारख्या आयात होणाऱ्या खाद्य तेलाच्या किमती हळूहळू कमी होतील. तसेच Rice Bran आणि Mustard Oil सारख्या देशात उत्पादित तेलांच्या किमती देखील कमी होण्याची शक्यता आहे.
नवीन बदलांमुळे Refining Sector मध्ये Capacity Utilization २०-२५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे रोजगार संधी निर्माण होतील आणि देश खाद्य तेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर होईल. यामुळे
गेल्या काही महिन्यांपासून खाद्य तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, त्यामुळे सामान्य माणसाचे मासिक बजेट कोलमडले होते. आता केंद्र सरकारने कच्च्या खाद्य तेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केले आहे.
या निर्णयामुळे केवळ आयातित तेलाच्या किमती कमी होतील, असा समज अनेकांचा आहे. मात्र, देशात उत्पादित होणाऱ्या तेलबियांच्या किमतीही कमी होण्याची शक्यता आहे.
याबाबत बोलताना सुधाकर राव देसाई म्हणाले, “जरी मोहरी तेल आयातीवर अवलंबून नसले, तरी खाद्य तेलाच्या बाजारावर दबाव येत असल्यामुळे त्याचे दर खाली येऊ शकतात. यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण अनेक घरांमध्ये मोहरीचे तेल मुख्यत्वे वापरले जाते
आयात शुल्क कमी केल्याने देशातील तेल शुद्धीकरण उद्योगाला नवसंजीवनी मिळणार आहे. कच्च्या तेलावरील आणि शुद्ध तेलावरील शुल्क फरकामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे देशातच कच्चे तेल आयात करून त्यावर प्रक्रिया करणे अधिक फायदेशीर ठरणार आहे.
या बदलामुळे देशांतर्गत उत्पादन वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.