कोयना प्रकल्पाने केली विक्रमी वीजनिर्मिती

चिपळूण, दि. २ : महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून ३२६९.०६ मेगावॅट अवर्स इतकी विक्रमी वीजनिर्मिती करण्यात आली आहे. यातून राज्य शासनाला सुमारे १४४ कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे. ३१ मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात सादर केलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. कोयना धरणातील वीजनिर्मिती पश्चिमेकडील जलविद्युत टप्प्यांमधील ६७.५० टीएमसी पाणीसाठ्याच्या वापरातून होत असते.
कोयना धरणातील १०५ टीएमसी पाण्याचे वाटप कृष्णा पाणीतंटा लवादाच्या निर्णयानुसार केले जाते. यामध्ये ६७.५० टीएमसी पाणीसाठा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आणि ४० टीएमसी पाणीसाठा पूर्वकडील सिंचन आणि बिगर सिंचन प्रकल्पांसाठी करण्यात येतो. पश्चिमेकडील जलविद्युत केंद्रांमधून कोळशावर वीजनिर्मिती करण्यात येते, त्यात सरासरी ४ ४० रुपये द्राने। १४४ कोटी एवढा जास्त खर्च शासनाला करावा लागतो.
कोयना धरण
कोयना धरणाच्या बांधकामाची सुरुवात १९५६ मध्ये झाली आणि १९६३ मध्ये ते पूर्ण झाले. हे धरण जलविद्युत निर्मिती आणि सिंचनासाठी निर्माण करण्यात आले असून, महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये याचा महत्त्वाचा वाटा आहे. कोयना नदीच्या शक्तीचा उपयोग करण्याच्या दूरदृष्टीपूर्ण उद्देशाने भारतीय सरकारच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला. भूकंपसह्य प्रदेशात स्थित असूनही, हे धरण अनेक मोठ्या भूकंपांना तोंड देत आजही अभेद्य उभे आहे. अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना म्हणून ते टिकून राहिले असून, शाश्वत विकासाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अमूल्य आहे.