बांगलादेशातील हिंचाचाराचा फटका कांदा निर्यातीला

नाशिक, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेश हिंसाचाराचा फटका नाशिकच्या कांद्याला बसला असून १०० पेक्षा जास्त ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकले आहेत. हिंसाचार वाढल्यानं सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेकडो ट्रक सीमेवर ट्रक अडकून पडले आहेत. नाशिकमधून दररोज ५०-६० ट्रक एवढा कांदा निर्यात होत असतो.
बांगलादेशामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असल्याने त्याचा परिणाम आता कांदा निर्यातीवर झाल्याचे दिसून आले आहे. बांगलादेश बॉर्डरवर कांदा आणि डाळिंबाने भरलेले शंभरच्या अधिक ट्रक निर्यातीच्या प्रतिक्षेत उभे आहेत. या ट्रकमध्ये तीन हजार टनाहून अधिक कांदा आहे. जास्त दिवस हे ट्रक सीमेवर उभे राहिल्यास कांदा निर्यात न झाल्यास, त्यात ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे हा कांदा खराब होईल. यामुळे कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना ६० ते ७० कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याचे बाजार भाव स्थिर आहेत. बांगलादेशात कांदा निर्यात न झाल्यास देशातंर्गत कांद्याचे भाव गडगडण्याची भीती व्यक्त होत आहे.
ML/ML/PGB
7 Aug 2024