सायबर सुरक्षा अत्यंत महत्वाची

नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा विद्या प्रसारक समाजाचे विधी महाविद्यालयात काल सायबर सुरक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेचे उदघाटन मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.
ॲड. ठाकरे यांनी यावेळी बोलतांना ‘ आज आपण डिजिटल युगात आहोत, पूर्वीपेक्षा जास्त तंत्रज्ञानावर आपले जीवन अवलंबून आहे, त्यामुळे सायबर सुरक्षेचे महत्त्व देखील वाढत आहे. आपल्या जीवनातील भरपूर गोष्टी या मोबाईल, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सॉफ्टवेअर यांवर अवलंबून आहेत.त्यामुळे सायबर सुरक्षा अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रासाठी लाभलेले व्याख्याते विकास नाईक यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कायदेशीर तरतुदी यांतील अंतर्गत समस्या आणि दायित्व या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रासाठी प्रमुख व्याख्याते स्वाती गोरवाडकर यांनी सायबर सुरक्षा आणि आवश्यक कौशल्ये विषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये डॉ तन्मय दीक्षित यांनी ‘ लिंक्डइन प्रोफाइलद्वारे करियर आणि विकास कौशल्य या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या संयोजक म्हणून डॉ चारुशीला खैरनार तर समन्वयक म्हणून डॉ निवेदिता जाधव यांनी काम पहिले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संचालक ॲड.लक्ष्मण लांडगे तसेच शिक्षणाधिकारी डॉ.विलास देशमुख, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या गडाख तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
ML/ML/SL
21 March 2024