पंतप्रधानांना ‘पनौती’ म्हणणाऱ्या राहुल गांधीना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आक्षेपार्ह शब्दांत उल्लेख करण्या प्रकरणी कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक गमावल्यानंतर पंतप्रधान मोदींवर राहुल गांधी ‘पनौती’ अशा आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली होती. राजस्थानमधील प्रचार सभेत राहुल पंतप्रधांबाबत हे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याविरोधात भाजपने निवडणूक आयोगात तक्रारही दाखल केली होती. या प्रकरणी निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांनी शनिवारी (दि. २५) सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्पष्टीकरण द्यावे असे आयोगाने सांगितले सांगितले आहे.
टीम इंडिया वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभूत होण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. अशी टीका करतना काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर अक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली होती. भारतीय संघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लकी नाहीत, ते उपस्थित होते, त्यामुळेच आपला संघ पराभूत झाला असे विधान राजस्थानमधील प्रचार सभेत केले होते.
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. राहुल गांधींनी देशाच्या पंतप्रधानांबद्दल केलेले वक्तव्य लज्जास्पद, निषेधार्ह आणि अपमानास्पद असल्याचं माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले होते.
SL/KA/SL
23 Nov. 2023