मराठा तरुणाने आरक्षणासाठी केली आत्महत्या
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले, मराठा आरक्षण मिळण्याचा कालावधी आता जवळ आल्याचे चित्र दिसत असतानाच जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी मुंबईत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुनील बाबुराव कावळे वय 45, चिकनगाव, ता. अंबड, जि. जालना असं या तरुणच नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आला आहे.
या तरुणाने स्वतःचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात ही घटना घडली. आत्महत्या केलेला तरुण जालन्याहून एकटाच मुबंईत आला होता. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्याने मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ML/KA/SL
19 Oct. 2023