उच्च न्यायालयाने ठोठावला, तहसीलदारांना दहा हजाराचा दंड …

छ. संभाजीनगर दि ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटीची रक्कम अदा करण्यासाठी कारखान्याची जमीन लिलाव करण्यास दिरंगाई केल्याबद्दल सिल्लोड तहसीलदारांना दहा हजारांचा दंड उच्च न्यायालयाने ठोठावला आहे.
कारखान्याच्या 105 सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदानाचे 8 कोटी 50 लाख रुपये थकीत असून ही रक्कम मिळवण्यासाठी कर्मचारी न्यायालयात गेले होते. कारखान्याची जमीन विक्री करून ही रक्कम कर्मचाऱ्यांना देण्याचे आदेश दिले होते. कारखान्याची 7 हेक्टर 43 आर जमीन विक्री काढण्यात आली होती. या प्रकरणी सिल्लोड तहसील प्रशासनाने लिलावात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने सिल्लोड तहसीलदारांना दहा हजाराचा दंड ठोठावला आहे. तर जमीन विक्री प्रकरणी 25 नोव्हेंबर पर्यंत कुठलीही स्थगिती राहणार नाही असा निकालही उच्च न्यायालयाने दिला आहे.
ML/KA/SL
4 Oct. 2023