कांद्याचे लिलाव झाले तब्बल १३ दिवसानंतर सुरू…

नाशिक, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांदा व्यापाऱ्यांचे प्रश्न महिनाभरात सोडवू, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्याने अखेर व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे, यामुळे बाजार समित्यांमध्ये तब्बल १३ दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत.
यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतू महिनाभरात मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर पुन्हा आक्रमक भूमिका स्वीकारली जाईल असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. ही लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यामुळे चाळीत साठवलेला कांदा विक्रीसाठी घेऊन जाण्याची शेतकऱ्यांची लगबगही सुरू झाली आहे.
ML/KA/SL
3 Oct. 2023