कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी काढली ट्रॅक्टर रॅली…
बुलडाणा, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ..कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा यासह विविध मागण्याफडे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी संघटनेच्यावतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला .
सप्टेंबर महिना सुरु पण जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस झाला नाही जिल्ह्यातील प्रकल्प ही कोरडे आहेत शेतातील पिके मान टाकायला लागले आहे त्यामुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा सरकारने या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील यांनी दिला आहे.
राज्यात सध्या जवळपास 21 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या झळा पोचण्यास सुरुवात झाली आहे जवळपास 20 ते 25 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शेतकरी बळीराजा हवालदिल झालेला आहे त्याकरता मायबाप सरकारचे लक्ष वेधण्याकरिता जे ट्रॅक्टर बळीराजा करता सदैव त्याच्या काळया मातीमध्ये साथ देत असतो. त्याच ट्रॅक्टरद्वारे सरकारला जागे करण्याकरता आणि आपल्या पदरात न्याय पाडून घेण्याकरिता लक्षवेधी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ML/KA/SL
6 Sept. 2023