सरकारची शिष्टाई असफल , जरांगे यांनी दिली चार दिवसांची मुदत

जालना, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना समजण्यात आज सरकारच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ अयशस्वी ठरले आहे. जरांगे यांनी पुढील चार दिवसात अध्यादेश काढून आरक्षण द्या अशी मुदत या शिष्टमंडळाला दिली आहे.
आज मंत्री गिरीश महाजन , संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाने
मनोज जरांगे यांची भेट घेऊन आरक्षणाच्या निर्णयासाठी तीस दिवसांची मुदत मागितली. सर्व सरकारी सोपस्कार आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊनच हा निर्णय घ्यावा लागेल , त्यासाठी एक महिना लागेल असे महाजन यांनी त्यांना सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र जरांगे यांनी आपण ४ दिवसांचा वेळ देतो असे म्हणणे कायम ठेवले. Government’s politeness failed, Jarange gave a four-day deadline
यावर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो असे मंत्र्यांनी सांगून आजची चर्चा संपविली. ही सगळी चर्चा सर्व प्रसारमाध्यमांवर थेट दाखविण्यात आल्याने यापूर्वी झालेल्या अनेक बंद दारा आडच्या चर्चेपेक्षा वेगळे चित्र आज पाहायला मिळाले.
आज आलेल्या शिष्टमंडळात आलेल्या मंत्री गिरीश महाजन,संदीपान भुमरे,अतुल सावे यांच्यासह आमदार नारायण कुचे,राजेश टोपे,माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली.
ML/KA/PGB
5 Sep 2023