फडणवीसांनी फोन करून बोलावले जरांगे पाटील यांना चर्चेला

मुंबई दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथील मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांना फोन केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चर्चेला येण्याचे निमंत्रण दिले असल्याची माहिती दिली आहे.
छत्रपती उदयनराजे यांनीही आंदोलकांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चर्चा करण्यासंबंधी निवेदन दिले होते . आंदोलकांवर लाठीमार करण्याच्या घटनेत
जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी लाठीचार्ज टाळायला हवा होता. सरकार कधीच अशा कारवाईचे समर्थन करीत नाही आणि करणार सुद्धा नाही. जे अधिकारी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. जे गुन्हे चुकीच्या पद्धतीने दाखल केले असतील, ते परत घेतले जातील असे फडणवीस यांनी सांगितले.
चर्चेनेच प्रश्न सुटत असतात, त्यामुळे तुम्ही चर्चा करायला या. मुख्यमंत्र्यांनी स्वतः निमंत्रण दिले आहे. चर्चेतून मार्ग काढू अशी विनंती फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना केली आहे त्यामुळे लवकरच आंदोलकांची सरकारसोबत बैठक होण्याची शक्यता आहे.
ML/KA/PGB 3 Sep 2023