WTC गमावल्यानंतर आता ICC ची भारतीय क्रिकेटपटूंवर कठोर कारवाई

 WTC गमावल्यानंतर आता ICC ची भारतीय क्रिकेटपटूंवर कठोर कारवाई

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट संघाला WTC च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून धक्कादायक पराभव सहन करावा लागला. भारतीय क्रिकेट चाहते टिम इंडियावर नाराज झाला आहेत. समाजमाध्यमांवरही क्रिकेटपटूंवर जोरदार टिका होत आहे. त्यातच आता ICC ने भारतीय क्रिकेट संघावर कठोर दंडात्मक कारवाई केली आहे.

भारतीय खेळाडूंना १०० टक्के मानधनाची रक्कम दंडाच्या स्वरुपात द्यावी लागणार आहे. कारण WTC च्या अंतिमic सामन्यात भारतीय संघाने धीम्या गतीने गोलंदाजी केली, असे कारण आयसीसीने दिले आहे. निर्धारीत वेळेत भारतीय संघाला दिलेली षटके पूर्ण करता आली नाहीत, त्यामुळे हा फटका भारतीय संघाला बसला आहे.

जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघावर मॅच फी ची ८० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. या सामन्यात चर्चेत राहिलेल्या शुभमन गिलवर देखील आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. (Latest sports updates)

शुभमन गिलला भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांना मिळालेल्या शिक्षेपेक्षाही मोठी शिक्षा मिळाली आहे. त्याच्यावर आयसीसी कोड ऑफ कंडक्टचा नियम २.७ मोडल्याप्रकरणी मॅच फीचा १०० टक्के दंड आकारला जाणार आहे.

यासह १५ टक्के अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे. म्हणजे गिलला मॅच फीच्या एकूण ११५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयावरून ट्विट केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करू शकला नाही. भारतीय संघाने ५ षटके कमी टाकली आहेत.

तर ऑस्ट्रेलिया संघाने ४ षटके कमी टाकली आहेत. त्यामुळे आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टचा नियम क्रमांक २.२२ चे उल्लंघन केल्या प्रकरणी दोन्ही संघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या नियमानुसार, प्रत्येक षटकासाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांच्या मॅच फी मधून २० टक्के रक्कम वजा केली जाणार आहे.

नुकत्यात IPL पार पडल्या, त्यानंतर WTC ची तयारी करण्यासाठी BCCI ने पुरेसा वेळ दिला नाही, त्यामुळे भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला असे, भारतीय क्रिकेट टिमचा कप्तान रोहीत शर्मा याने म्हटले आहे.

SL/KA/SL

12 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *