त्र्यंबकेश्वर प्रकरणी एसआयटीकडून चौकशीला सुरुवात

नाशिक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर कथित प्रवेश प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाचा तपास करण्यासाठी शुक्रवारी एसआयटीचे पथक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले. पथकातील अधिकाऱ्यांनी विश्रामगृहात दोन्ही गटातील लोकांशी संवाद साधला.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात संदल मिरवणुकीच्या वेळी एका गटाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते.
यावरुन वाद निर्माण होऊन सकल हिंदू समाजाच्या वतीने मंदिर शुध्दीकरणाचा विधी करण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणाची एसआयटीतर्फे चौकशी करण्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी एसआयटी पथकाने हिंदू, मुस्लिम समाजबांधवाची वेगवेगळी बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा करुन परंपरा, पूजा पध्दती याविषयी माहिती घेतली.
एसआयटीचे सुखविंदर सिंह, अप्पर पोलीस महासंचालक यांनी सांगितले की, १३ में रोजी त्र्यंबकेश्वरला जी घटना घडली त्या पर्श्वभूमीवर चौकशीकरिता आलो आहे, काही लोकांना भेटलो, काही लोकांना नंतर भेटणार आहे. याबाबत सर्व माहिती आणि पुरावे एकत्र केली जाईल आणि नंतरच सर्व निर्णय होईल असे सांगितले.
ML/KA/SL
20 May 2023