सत्तासंघर्ष सुनावणी पाच जणांच्या घटनापीठासमोरच

 सत्तासंघर्ष सुनावणी पाच जणांच्या घटनापीठासमोरच

दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर झालेला सत्तासंघर्ष याची सुनावणी सात सदस्यीय घटना पीठाकडे न जाता पाच सदस्यीय घटना पिठासमोरच होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गेले तीन दिवस चाललेल्या यावरच्या सुनावणी नंतर आज हा निर्णय देत उध्दव ठाकरे गटाची अशी मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. आता पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी पासून सुरू होईल.

अरुणाचल प्रदेशच्या नाबाम रेबिया खटल्याचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी करत ठाकरे गटाने हे प्रकरण सात सदस्यांच्या घटनापिठाकडे नेण्याची मागणी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली होती, मात्र ती आज फेटाळून लावण्यात आली त्यामुळे सत्ता संघर्षावर असलेल्या मूळ याचिकांवर आता सुनावणी पाच जणांच्या घटनापिठासमोरच होईल.Power struggle hearing before the five-member constitution bench

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून राजकारणात बहुमताला महत्त्व असते आणि ते आमच्याकडे आहे , आम्ही घटनेनुसार सरकार स्थापन केले आहे असेही ते म्हणाले.

ML/KA/PGB
17 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *