दहावी,बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय
मुंबई,दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात २१ फेब्रुवारी पासून १२ वीची तर ३ मार्चपासून परीक्षा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेत होणारे कॉपी तसेच पेपरफुटीचे प्रकार टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ दरवर्षी प्रमाणेच सुसज्ज होत आहे. यावर्षी अधिक सतर्कतेचा उपाय म्हणून काही परीक्षेच्या नियमात काही महत्त्वाते बदल करण्यात आले आहेत.
हे आहेत नवीन बदल
- आता वर्गात एकदा प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या की त्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही. याआधी परीक्षा सुरू झाल्यावर अर्धातास उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जात असे.
- विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेच्या अर्धातास आधी परीक्षा केंद्रांवर हजर राहणे बंधनकारक. सकाळ सत्रात होणाऱ्या परीक्षेची वेळ १०. ३० नोंदवलेली आहे तर दुपारच्या सत्रामध्ये होणाऱ्या पेपरसाठी प्रवेश पत्रावर अडीच ची वेळ आहे.
- विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेतच प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. याआधी 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जात होती.
- कॉपी केल्यास काय शिक्षा होणार याचे धडे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधीच द्यायचे आहेत. तसेच याबाबच्या सुचना हॉल तिकीटच्या मागे देखील छापण्यात येणार आहेत.
- परीक्षेच्या वेळी इतर विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्यास, शेजारच्याचे उत्तर पाहून लिहिल्यास, तोंडी उत्तर सांगितल्यासही विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- उत्तरपत्रिकेत प्रक्षोभक भाषेचा वापर, शिवीगाळ, धमकी इत्यादी स्वरूपात लेखन केल्यास कारवाई करण्यात येईल
- उत्तरपत्रिकेत सिनेमाची गाणी, डायलॉग, गोष्ट लिहिल्यास देखील कारवाई करण्यात येणार आहे.
SL/KA /SL
13 Feb. 2023