दानशूर गुरुजींनी भागविली अख्या गावाची तहान
यवतमाळ, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील इंझाळा हे आडवळणावरचे लहानसे गाव. गावात फेब्रुवारी मार्चपासूनच दरवर्षीची पाण्याची टंचाई ही जणू पाचवीलाच पुजलेली .यावर उपाय म्हणून शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत दोन विहिरी खोदल्या .Danshur Guruji quenched the thirst of Akhya village
परंतु पाणी लागलेच नाही त्यामुळे गावकऱ्यांना नाईलाजाने दोन /तीन किलोमीटर अंतरावरील शेतातून पाणी आणण्याशिवाय पर्याय नव्हता . मात्र याच गावातील शिक्षक असलेले सुरेश कस्तुरे यांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत विहीर खोदली. विहिरीला प्रचंड पाणी लागले . ग्रामपंचायत सदस्यांनी सुरेश कस्तुरे यांना याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी कोणतीही अट न टाकता सदर विहीर ग्रामपंचायतला कागदपत्रासह दान दिली. सोबतच अडीच हजार चौरस फुट जागा सुद्धा ग्रामपंचायतला दान केली.
परिणामी गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट आता पूर्णपणे थांबली आहे. याबाबत गावकरी समाधान व्यक्त करीत आहेत. या दानशूर शिक्षकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ML/KA/PGB
29 Jan. 2023