सुख शांतीसाठी किन्नरांची कलश यात्रा….
अमरावती, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना काळामध्ये देशावर मोठं संकट आलं सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली त्यामुळे आपल्या देशात पुन्हा सुख शांती आणि समृद्धी नांदो,देशाची प्रगती होवो अशी प्रार्थना यासाठी आज अमरावतीत तृतीयपंथियांनी कलश यात्रा काढली. Kalash Yatra of Kinnars for happiness and peace….
अमरावती मधे सुरू असलेल्या राज्यस्तरीय किन्नर संमेलनामध्ये आज अमरावती शहरातून तृतीयपंथीया तर्फे कलश यात्रा काढण्यात आली . यात नाचत व डोक्यावर कलश ठेवून कलश यात्रा सुरू झाली, त्यानंतर अमरावतीच्या प्रसिद्ध असलेल्या श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी मंदिरामध्ये घंटा चढवून अंबादेवीची ओटी भरण्यात आली. यावेळी देशाच्या सुख शांतीसाठी तसेच प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली.
ML/KA/PGB
9 Jan. 2023