जैन समाजाचा मेट्रो जंक्शन ते आझाद मैदान पायी मोर्चा
मुंबई दि.4(एम एमसी न्यूज नेटवर्क):जैन jain samaj समाजाचे पवित्र तीर्थस्थान असलेल्या श्री सम्मेद शिखजी या ठिकाणाला पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाविरुद्ध जैन समाजाच्या वतीने आज मेट्रो जंक्शन ते आझाद मैदान मूक पायी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 15 हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते.त्यामुळे मॅटो सिनेमा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
जैनो को प्रानोसे प्यारा हे ,सुमेद शिखरजी हमारा हे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
आयोध्या मध्ये मुस्लिमांना भारत सरकारने जी जागा दिली तशीच जागा भारत सरकारने झारखंड मध्ये आम्हाला जैन बांधवांना उपलब्ध करून द्यावी.तसेच सुमेद शिखर तीर्थक्षेत्र जाहीर करावे अशी सकल जैन समाजाकडून सरकारला विनंती आहे.जर तीर्थक्षेत्र जाहीर नाही केले तर महाराष्ट्रातील सर्व जैन समाज येणाऱ्या दिवसात येथे लाखोंच्या संख्येने जमा होऊन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चक्का जाम करू
असा इशारा जैन समाजाचे राष्ट्रीय नेते राकेश मेहता यांनी दिला.
मोर्चाचे आयोजक जमनलाल जैन म्हणाले की, झारखंड राज्यामध्ये श्री समेद शिखरजी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी जगभरातून अनेक भावी दर्शनासाठी येतात. झारखंड सरकारने या ठिकाणाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड सरकारने हा निर्णय मागे घ्यावा.
या ठिकाणाला जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र घोषित करावे .
यावेळी मोर्चात सहभागी झालेले विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर म्हणाले की, मी या पवित्र स्टेज वरून आपल्याला असे आश्वासन देतो की, मी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपल्या जैन समाजाची जी व्यथा आहे. ती त्यांच्या समोर मांडून तिचा आवाज दिल्ली पर्यन्त घेऊन जाणार आहे.
या सर्व प्रक्रियमध्ये मी तुमच्या सोबत सदैव असणार आहे . तसेच ज्यांना कोणाला अस वाटत असेल की जैन समाज संपला आहे .कमी झाला आहे ,त्यांनी येथे येऊन जरून पहावे असे ही ते म्हणाले.
ML/KA/PGB
4 Jan 2022