ट्विटर अकाऊंटवरून कुणी ट्वीट केलं? हे समोर यायला हवं : अजित पवार
मुंबई , दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सत्ताधारी भाजपातील नेतेमंडळींनी महापुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महा मोर्चात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार ajit pawar यांनी ,केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? हे रान उठवण्याचं काम कुणी केलं? हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सहा महिन्यात महापुरुषांचा अवमान व्हायला लागला. महाराष्ट्रातील गावं शेजारी राज्यांत जाऊ असं म्हणायला लागली आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री वेगवेगळे दावे करायला लागले आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कुणी ट्वीट केलं? हे समोर यायला हवं असे मत व्यक्त केले.
काही महिन्यांपूर्वी जे सरकार राज्यात सत्तेत आले आहे. दुर्देवाने महाराष्ट्राच्या मातीला फुटीचा, गद्दारीचा शाप असला तरी जेव्हा महाराष्ट्रावर संकट असतं, तेव्हा महाराष्ट्र एकजूट होऊन पेटून उटतो आणि पेटून उठल्यानंतर ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही, याची साक्ष देणारा हा मोर्चा आहे ,अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.
बेळगाव, निराणी, कारवारसह सीमाभागातील ८६५ मराठी गावं महाराष्ट्रात आणण्याचा संघर्ष सुरू असताना महाराष्ट्रातील गावं अचानक कर्नाटकमध्ये जाण्याचं का जाहीर करू लागले. याचं टूलकिट कुठून जारी झालं? याचा नागरिकांनी विचार करायला हवा. अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये काम केलं. पण कधी सीमाभागातील गावं असं म्हणत नव्हती. देशातल्या इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र वेगळा आहे. या मातीला शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा आहे.
आपल्याला एवढ्यावर थांबून चालणार नाही. आपण एकजूट दाखवून सरकारच्या चुकीच्या निर्णयांना थांबवण्यासाठी सरकारला त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण करायला हवं असे ही पवार म्हणाले.
ML/KA/PGB
17 Dec 2022