अंबाबाई किरणोत्सव सोहळा
कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य कलेचा आविष्कार असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई Mahalakshmi Ambabai मंदिरातील दक्षिणायन कालखंडातील किरणोत्सव सोहळा सध्या सुरू आहे. पहिल्याच दिवशी बुधवारी मावळतीच्या सुवर्ण किरणांनी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी देवीचा चरण स्पर्श केला.
साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या किरणोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी म्हणजे काल अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत मावळतीची सूर्यकिरणं पोहोचली आहेत.अपेक्षेप्रमाणे काल पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव संपन्न झाला आहे.
बुधवारच्या तुलनेत आकाश निरभ्र असल्यानं काल मावळत्या सूर्यकिरणांची तीव्रता ही दुप्पट असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा किरणोत्सव सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितलं.
किरणोत्सव पाहण्यासाठी भाविक-पर्यटकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, किरणोत्सव मार्गातील बहुतांशी अडथळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीनं किरणोत्सव सुरू होण्यापूर्वीच काढण्यात
आले आहेत.
यंदा किरणांची तीव्रता चांगली असून किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होईल, अशी माहिती खगोलशास्त्र अभ्यासक प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली.वर्षाच्या दक्षिणायणाच्या कालखंडातील किरणोत्सवास बुधवारी सायंकाळी ५ वाजून २ मिनिटांनी सूर्यकिरणे पश्चिमेकडील महाद्वारातून मंदिराच्या दिशेने आली. ५ वाजून ५ मिनिटे ते ५ वाजून २३ मिनिटे असा गरुडमंडपातून प्रवास केला.
ML/KA/PGB
11 Nov .2022