केंद्राकडून १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ
नवी दिल्ली, दि. १३ : खरीप हंगाम २०२६-२७ साठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSP मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किफायतशीर भाव मिळावा, यासाठी सरकारने २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे.
MSP दर पुढीलप्रमाणे :

मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीत (MSP) सर्वाधिक वाढ सूर्यफूल बियाण्यांसाठी (६२२ प्रति क्विंटल) सुचवण्यात आली आहे. त्यानंतर कापूस (५५७ प्रति क्विंटल), नायजरसीड (५१५ प्रति क्विंटल) आणि तीळ (५०० प्रति क्विंटल) यांचा क्रमांक लागतो.
किमान आधारभूत किंमत हे असे हमीभाव आहे जे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकावर मिळते. बाजारपेठेत त्या पिकाच्या किमती कमी असल्या तरीही. यामागील तर्क असा आहे की, बाजारपेठेत पिकांच्या किमतींमध्ये होणाऱ्या चढ-उताराचा परिणाम शेतकऱ्यांवर होऊ नये. त्यांना किमान किंमत मिळत राहावी.
सरकार प्रत्येक पीक हंगामापूर्वी CACP म्हणजेच कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार MSP (किमान आधारभूत किंमत) निश्चित करते. जर एखाद्या पिकाचे बंपर उत्पादन झाले तर बाजारात त्याच्या किमती कमी होतात, तेव्हा MSP त्यांच्यासाठी निश्चित किमतीचे काम करते. हे एक प्रकारे किमती घसरल्यास शेतकऱ्यांना वाचवणाऱ्या विमा पॉलिसीसारखे काम करते.