बाप्पाच्या विसर्जनानंतर राऊत यांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं का?

 बाप्पाच्या विसर्जनानंतर राऊत यांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं का?

मुंबई दि ७ — “गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर राऊत यांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं आहे का?” असा सवाल भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उपस्थित केला. संजय राऊत आता हवेत बाण चालवू लागले आहेत. देवेंद्रजींच्या जाहिरातीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. खरं तर अशा जाहिराती सर्वसामान्य जनतेच्या प्रेमातून येतात. पण उद्धव ठाकरे आणि राऊत यांचा जनतेशी वा कार्यकर्त्यांशी काहीही संबंध नाही, त्यामुळे त्यांना हा प्रश्न पडणं साहजिक आहे.”

बन यांनी राऊतांच्या विधानावर टोल घेताना म्हटलं की, “विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचं संपूर्ण कॅम्पेन 40–50 कोटीत होतं आणि ते एका दिवसात झालं. असा हस्यास्पद दावा राऊंतांनी केला. त्यामुळे संजय राऊत हवेत अजून किती बाण सोडणार? खरं तर कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा देवेंद्रजींवर प्रेम आहे, त्यातूनच जाहिरात आली.”

बन पुढे म्हणाले की, “राऊत यांनी काळ्या पैशाचा उल्लेख केला, परंतु सामना वृत्तपत्राचा कारभारच काळ्या पैशात चालत असल्याची शक्यता जास्त आहे. देवेंद्रजींची जाहिरात सामना मध्ये आली नाही म्हणून कदाचित तुमचं पोट दुखत असेल. उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त सामनात येणाऱ्या जाहिराती काळ्या पैशातून येतात का, हा माझा सवाल आहे.”ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *