mmcnews mmcnews

राजकीय

राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष

मुंबई, दि.२४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमधून केला आहे. राज्यामध्ये पावसाची स्थिती गंभीर आहे राज्यामध्ये एकूण १९ जिल्हे त्यातले ४० तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत तर मध्यम स्वरूपाचा […]Read More

महानगर

डोंगर उतारावर राहणाऱ्यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे पालिकेचे आवाहन

‘मुंबई दि.24( एम एमसी न्यूज नेटवर्क): विक्रोळी , पवई आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते […]Read More

कोकण

बंदरात होडी उलटली, चार खलाशी बेपत्ता, शोधकार्य सुरू

सिंधुदुर्ग, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात वेंगुर्ला बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ आणि अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी काल रात्री निघाले होते. मात्र रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली. यावेळी होडीवर असलेले सात खलाशी साहित्यासह समुद्राच्या पाण्यात पडले. त्यातील तीन खलाशी हे […]Read More

विदर्भ

ताडोबात पार पडली मचाण वन्यजीव गणना, वन्यजीव प्रेमींनीही घेतली संधी

चंद्रपूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर (म्हणजेच गाभा आणि बाह्य) क्षेत्रात वन्यजीवांची संख्या किती आहे, त्यांचा वावर कोणकोणत्या भागात आहे, कोणता प्राणी कुठे दिसतो, याची माहिती संकलित करण्याच्या उद्देशानं मचाण प्राणीगणना केली जाते. वन्यजीवप्रेमींची नवी पिढी घडविण्यासाठी असे अभियान राबविण्याची वनविभागाची ही जुनी कवायत आहे. या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

उष्माघातामुळे बाराशे कोंबड्यांचा बळी; पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल

सांगली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील आंधळी येथील सीताराम भगवान जाधव यांच्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या शेडमधील १२०० कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला. त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या भर दुपारी अचानकपणे लोडशेडिंग सुरु झाल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने परिसरातील सर्व ब्रॉयलर कोंबडी शेड […]Read More

महानगर

डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू, ६५ गंभीर

डोंबिवली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डोंबिवली MIDC तील केमिकल कंपनीत आज दुपारी २ च्या सुमारास बॉयलरचा प्रचंड स्फोट आणि त्यानंतर छोटे स्फोट झाले. या घटनेत आत्तापर्यंत ८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी आगीचे लोळ आणि धुराचे लोट […]Read More

देश विदेश

Google ची ही सेवा २०जूनला होणार बंद

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Google कडून दिली जाणारी एक सेवा 20 जून 2024 पासून कायमची बंद होणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. Google One VPN Service) सेवा बंद करण्यात येणार आहे. गूगलने यापूर्वी सांगितले होते की ते गूगल वन वीपीएन सेवा बंद करण्याची तयारी करत आहे. मात्र, कंपनीने त्यावेळी तारीख […]Read More

ट्रेण्डिंग

बुथनिहाय मतदानाची आकडेवारी देण्यास निवडणूक आयोगाचा नकार

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणुकीच्या ४८ तासांच्या आत बूथनिहाय मतदानाची आकडेवारी सार्वजनिक करण्याच्या मागणीला निवडणूक आयोगाने विरोध केला आहे. काल सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोगाने म्हटले आहे की, ‘फॉर्म 17C (प्रत्येक मतदान केंद्रावर टाकलेल्या मतांची नोंद) वर आधारित मतदानाचा डेटा उघड केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, कारण त्यात मतपत्रिकांच्या मोजणीचाही […]Read More

देश विदेश

या राष्ट्रांनी केली पॅलेस्टाईनला औपचारिकरीत्या मान्यता देण्याची घोषणा

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गाझा पट्टीवर ताबा मिळवून पॅलेस्टाइनची नाकाबंदी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या इस्रायलला मोठा धक्का बसला. पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून आपण मान्यता देत असल्याची घोषणा नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या देशांनी काल केली . याबाबत औपचारिक मान्यता देण्याची प्रक्रिया २८ मे रोजी होणार आहे. या नाट्यपूर्ण घटनेनंतर इस्रायलने या देशांतील आपल्या […]Read More

देश विदेश

RBI ने चार महिन्यांत खरेदी केले २४ टन सोने

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत 24 टन सोने खरेदी केले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या चार महिन्यांत सुमारे दीडपट सोन्याची खरेदी झाली आहे. भू-राजकीय तणावादरम्यान अस्थिरता टाळण्यासाठी RBI ने आपल्या साठ्यामध्ये भर घालत आहे. बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, 26 […]Read More