mmcnews mmcnews

महानगर

६४ ‘झोपु’ योजना राबवताना स्थानिकांना विश्वासात घ्या

मुंबई दि २१:– बृहन्मुंबई महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर ६४ झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवताना समूह विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून सदर योजना जलदगतीने मार्गी लागण्यासाठी प्रकल्प लाभधारक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे अन्यथा पालिकेच्या ६४ झोपु प्रकल्प धारावी पुनर्विकास योजना बनतील, असा इशारा समाजवादी पक्षाचे आमदार व पालिकेतील माजी गटनेते रईस शेख यांनी दिला आहे. यासंदर्भात माहिती […]Read More

राजकीय

प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंपुनर्विकास बैठक…

पुणे दि २१– राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाची बैठक आज बुधवार दिनांक २१ मे २०२५ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे पार पडली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य आमदार उमाताई खापरे, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिकांचे अधिकारी, […]Read More

महानगर

ई-चलन तक्रारीपैकी ५९% तक्रारी फेटाळल्या – RTI द्वारे माहिती उजेडात

‘वन स्टेट वन चलन’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मुंबई वाहतूक पोलीस विभागाने १ जानेवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तब्बल ₹५५६ कोटी ६४ लाख २१ हजार ९५० इतका दंड वसूल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या RTI अर्जावरून ही माहिती समोर आली आहे. सदर कालावधीत एकूण १,८१६१३ ई-चलन विरोधात ऑनलाईन […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले जयंत नारळीकर यांचे अंत्यदर्शन…

पुणे दि २१– ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण आणि पद्मविभूषण जयंत नारळीकर त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार , पुण्याचे विभागीय आयुक्त, आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेत, पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केलं. त्यानंतर पुणे पोलीस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली..Read More

ऍग्रो

अवकाळी पावसाचा कहर, 87 जनावरे दगावली, शेतीला बसला फटका…

जालना दि २१:– जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात मागील दहा दिवसांमध्ये 7 जणांसह 87 जनावरे अंगावर वीज पडून दगावली आहेत. तर 1925 हेक्टरवरील शेतीला ही अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार 187 गावातील 2 हजार 645 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. यात 1 […]Read More

महानगर

मुक्त तसेच ई वेबसाईट व ई पेपर वर काम करणाऱ्या

मुंबई प्रतिनिधी : सरकारने मुक्त तसेच ई वेबसाईट व ई पेपर वर काम करणाऱ्या पत्रकारांना दर महिना 10 हजार रुपये पेन्शन स्वरूपात द्यावेत अशी मागणी अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन चे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष देसाई यांनी नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. मुक्त पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर मोठे संकट ओढवले असून त्यांना […]Read More

मनोरंजन

अक्षय कुमारने परेश रावलांवर दाखल केला 25 कोटींचा दावा

मुंबई, दि. २० : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने परेश रावल यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. हा वाद ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या संदर्भात आहे, ज्याचे चित्रीकरण परेश रावल यांनी अचानक सोडल्याचा आरोप आहे. अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊसने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे, ज्यामध्ये चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावर सोडल्यामुळे […]Read More

पर्यावरण

अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन

मुंबई दि २०– महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. 22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र […]Read More

महानगर

रायगडमधील पोशीर प्रकल्पास ६ हजार ३९४ कोटी

मुंबई, दि. २० : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोशीर प्रकल्पास 6394.13 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर 12.344 टी.एम.सी.चे धरण बांधणे प्रस्तावित आहे. प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 9.721 टी.एम.सी.आहे. त्यापैकी पिण्यासाठी 7.933 टी.एम.सी. आणि औद्योगिक वापरासाठी […]Read More

महानगर

MGL ला बायोमेथेनेशन प्रकल्पासाठी देवनार येथील भूखंड

मुंबई दि २०– महानगर गॅस लिमिटेड कंपनीला देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात देण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र सरकारचे गोबरधन योजनेअंतर्गत शहरी भागात 75 बायोमेथेनेशन प्रकल्पासह 500 नवीन बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी येणारा खर्च तेल आणि वायू विपणन संस्था करणार आहे. मात्र […]Read More