या राज्यातील ९१ टक्के जनतेला शून्य वीज बिल
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढते वीजेचे बिल हे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र पंजाब राज्यात मात्र गेल्या दोन महिन्यात महीन्यांत ९१ टक्के जनतेचे वीज बिल शून्य आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार मागील दोन महिन्यांमध्ये राज्यातील ९१ टक्के लोकांनी या मोफत यूनिटच्या मर्यादेतच वीज वापरल्याने विजेची बिलं शून्य रुपये आहेत.
मागील वर्षी ३ डिसेंबर रोजी जितकी विजेची मागणी होती त्यापेक्षा यंदा ही मागणी १९ टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी विजेचा वापर ६ हजार ३३ मेगावॅट इतका होता. यंदा हा वापर ७ हजार १५६ मेगाव्हॅट इतका आहे.
पंजाब सरकारने जुलैपासून ३०० यूनिट मोफत वीज देण्याचा निर्णय लागू केला आहे.वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विजेच्या मागणीमध्ये पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली तरी त्याला मोठी मागणी आहे असं म्हणत नाही. मात्र एखाद्या दिवशी अचानक १९ टक्के वाढ असेल तर मागणी अधिक असल्याचं म्हटलं जातं. यावरुन ज्या लोकांना ३०० यूनिटपर्यंत मोफत वीज दिली जात आहे त्यांच्याकडून वापर वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
SL/KA/SL
28 Dec. 2022