या गावात भरते महात्मा गांधींजींच्या नावाने यात्रा

 या गावात भरते महात्मा गांधींजींच्या नावाने यात्रा

लातुर,दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशासाठी आयुष्य वेचलेल्या महान नेत्यांच्या प्रभाव समाजमनावर वर्षानुवर्षे टिकून राहतो. ग्रामीण भागात काही ठिकाणी तर अशा महान व्यक्तींच्या कार्याबाबत आदर व्यक्त करण्यासाठी लोकपरंपरांचा आधार घेतला जातो. असाच एक विशेष उपक्रम लातुर जिल्ह्यातील उजेड या गावात आयोजित केला जाते. येथे दरवर्षी २४ ते २७ जानेवारी दरम्यान महात्मा गांधीजींच्या स्मृतीनिमित्त यात्रा भरवली जाते.

उजेड या गावात २६ जानेवारी १९५४ पासून गांधी बाबांच्या  नावे यात्रा भरते. ही यात्रा कशी सुरू झाली याची कहाणी देखील रंजक आहे. उजेड गाव हे पूर्वी हैदराबादच्या निजामाच्या राजवटीखाली हिसामाबाद या नावाने ओळखले जात असे. या गावात पिराच्या नावाने उरुस भरत असे. मात्र हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलिन झाले आणि हा उरुस बंद झाला. त्यानंतर गावातील मुस्लिमांना उरुस पुन्हा सुरू करण्याची इच्छा होती. तर हिंदूना महादेवाची जत्रा भरवायची होती. दोन्ही गट आपल्या मागणीवर ठाम होते. यावर तोडगा काढण्यासाठी गावामध्ये ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली एक बैठक भरवण्यात आली आणि त्यात एक अनोखा तोडगा काढण्यात आला आला आणि आश्चर्य म्हणजे गावातील दोन्ही गटांनी तो स्वीकारला देखील.

या तोडगा म्हणजे उरुस किंवा महादेवाच्या यात्रे ऐवजी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे राष्ट्रीय नेते महात्मा गांधीजी यांच्या नावाने दरवर्षी यात्रा भरवली जावी हा होता. आता गेली 69 वर्षे कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता लोकसहभागातून ही गांधीबाबांची यात्रा दरवर्षी आयोजित केली जाते.

 

SL/KA/SL

24 jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *