नव्याने पेरलेल्या कपाशी पिकावर वाणू कृमीचे संकट…

वाशीम दि २४:– वाशीमच्या कारंजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आठ दिवसांपूर्वी कपाशी पेरणी केली होती. पाण्याची सोय करून दोन वेळा पाणी दिलं आणि पीक उगवू लागलं. पण आता वाणू कृमींचा कपाशीवर जबरदस्त प्रादुर्भाव दिसून येतं असून ही कीड कपाशीची कोवळी झाडं कुर्तडून नष्ट करताहेत.
त्यामुळं शेतकऱ्यांवर नवे संकट आलंय. बेंबळा येथील शेतकरी संदीप काळेकर यांना थेट मजूर लावून वाणू काढून शेताबाहेर फेकण्याचं कामं सुरु केलंय. ही कीड नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन करावं,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ML/ML/MS