मातंग समाजाला राजकीय वाटा मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि. १९ : मातंग समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सदैव प्रयत्नशिल आहे.बौध्द आणि मातंग समाज हे भाऊ-भाऊ म्हणुन महाराष्ट्रात एकत्र आहेत.अनुसुचित जातीतील 59 जातीं पैकी महाराष्ट्रात बौध्द आणि मातंग प्रमुख समाज आहेत.अनुसुचित 59 जातींना एकत्र आणुन त्या सोबत ओबीसी,मराठा,मुस्लिम आणि सर्व अप्लसंख्यांक समाजाचे रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेड्यांखाली ऐक्य उभारणे हे आपले उदिष्ट आहे. सर्व समाजला एकत्र करुन रिपब्लिकन पक्ष सत्तेचा वाटा मिळवू शकतो.मातंग समाजाला आगामी स्थानीक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष उमेदवारी देईल.महायुतीच्या माध्यामातुन महामंडळामध्ये ;शासकीय समितींमध्ये मातंग समाजाला स्थान देऊन आगामी काळात मातंग समाजाला सत्तेचा वाटा मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
कोल्हापुर येथील दसरा चौकात रिपब्लिकन पक्ष मातंग आघाडीच्या वतीने राज्यव्यापी मातंग समाज न्याय हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती.हि परिषद मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली .या परिषदेला हजारो मातंग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापुर जिल्हाअध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या अध्यक्षतेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अण्णा वायदंडे यांच्या पुढाकारातुन कोल्हापुरात मातंग समाज न्याय हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती.या परिषदेत प्रमुख मार्गदर्शन म्हणुन ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; अशोक गायकवाड , प्रा.शहाजी कांबळे ,परशुराम वाडेकर ; मंगलराव माळगे संजय लोखंडे ; नंदकुमार साठे आदी अनेक मान्यावर उपस्थित होते.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष देशात प्रबळ पक्ष करण्याचा माझा प्रयत्न आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी बौध्द मातंग समाजाच्या एकजुटी सोबत दलितामधिल सर्व जाती; आदिवासी आणि ओबीसी,मराठा सर्व जाती धर्मांना रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेड्यांखाली एकत्र आणावे लागेल मातंग समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निळा झेंडा हाती घेऊन गावागावातील सर्व जाती धर्मींयांना रिपब्लिकन पक्षात जोडले पाहिजे.दलित,आदिवासी,ओबीसी,बहुजन, सर्व जाती धर्मांच्या मतदानातुन रिपब्लिकन पक्ष एक व्यापक पक्ष होईल.सत्तेचा दावेदार पक्ष होईल.लोकप्रतिनिधि आपण निवडुन आणु शकलो तर राजकीय सत्तेचा वाटा आपल्याला निश्चित मिळवता येईल.मातंग समाजाला सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष प्रबळ करावा लागेल. त्यासाठी गावागावत सर्व जाती धर्मींयांना रिपब्लिकन पक्षात एकत्र जोडण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे देशाला लाभलेले नेतृत्व हे खंबीर नेतृत्व आहे.दहशदवादाचा बीमोड करण्यासाठि त्यांनी कठोर पावले उचलली आहेत.पाकव्याप्त काश्मिर मधील आतंकवाद्यांची तळे उधवद्त करण्याचे भारतीय सैन्यदलाने केलेले काम अभिनंदनीय आहे. आपल्या भारत देशाच्या सैनिकांनी अभूर्तपूर्व शौर्य दाखवून पाकिस्तनाला चारी मुंड्याचित केले आहे.दहशदवाद संपेपर्यंत भारत हा सदैव युद्धासाठी सज्ज राहिल.दहशदवाद नष्ट करण्यासाठी मोदींनी घेतलेल्या भुमिकेला देशभरातील दलितांचा पूर्ण पाठिंबा आहे असे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळाला 1हजार कोटी भांडवल मिळवून देणार.मातंग समाजातील बेरोजगार तरुणाना वीनाअट वीना जामिन उद्योगासाठी कर्ज दिले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करु.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळांच्या अध्यक्ष किंवा संचालक पदी रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष अण्णा वायदंडे यांना संधी देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी आश्वासन दिले.