रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी त्रिस्तरीय पथकांची निर्मिती

चंद्रपूर दि २:– चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी आणि मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने त्रिस्तरीय पथकांची निर्मिती केली आहे. या रानटी हत्तींनी ताडोबा पर्यंत धडक मारल्याने वनविभाग ऍक्शन मोड वर आलं असून याबाबत काल उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाव, रेंज आणि जिल्हास्तरीय पथक गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. हत्ती दाखल होण्याची शक्यता असलेल्या संभाव्य गावांमध्ये जनजागृती केली जाणार असून GIS सेल आणि थर्मल ड्रोन , थर्मल कॅमेऱ्यांच्या मदतीने हत्तींच्या हालचालींचा अंदाज घेऊन तो संबंधित अधिकाऱ्यांना व ग्रामस्थांना कळविला जाईल.
