तुम्ही कोर्टात का गेला होतात, मग साध्य झाले का ते

 तुम्ही कोर्टात का गेला होतात, मग साध्य झाले का ते

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सवाल साधा सरळ आहे, तुम्ही कोर्टात कशाला गेला होतात? हे सरकार अवैध घोषित करण्यासाठी गेला होता ना? करू शकला का? तर उत्तर नाही. तुम्ही कोर्टात गेला होता 16 आमदाराला अपात्र करण्यासाठी..16 आमदार अपात्र करू शकला का? तर नाही. तुम्ही न्यायालयात गेला होतात, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलण्यासाठी? तुम्ही विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकला का? तर नाही असे सवाल मुंबई भाजपाचे अध्यक्ष ऍड आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

तुम्ही कोर्टात गेला होतात राज्यपाल महोदयांनी घेतलेल्या भूमिका चुकीच्या आहेत त्या बदलल्या पाहिजेत हे करण्यासाठी. मग तुम्ही राज्यपालांचा निर्णय बदलू शकलात का ? तर त्याचे उत्तर ही नाही असेच आहे. तुम्ही कोर्टात गेला होता आम्हाला पुन्हा सत्तेत बसवा हा निवाडा मागण्यासाठी, तुम्हाला सत्तेत बसवण्याचा निवाडा आला का? तर नाही. तुम्हाला शिंदेंना अवैध ठरवायचं होतं म्हणून तुम्ही न्यायालयात गेलात तर सरकारला अवैध ठरवू शकलात का? तर नाही. त्यामुळे सलग सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही अशी आहेत. तुम्ही केलेली मागणी आणि कोर्टाकडून मिळालेले उत्तर हे नकारात्मक असल्यामुळे तुमचा सत्ता सरपटूपणा आता इथपर्यंत गेला की गिरा तो भी टांग उपर म्हणजेच उद्धव ठाकरेंचं धोरण यापेक्षा वेगळे काही नाही अशी टीका शेलार यांनी केली आहे.

जे उद्धवजी स्वतःचा पक्ष वाचवू शकले नाही, स्वतःच्या पक्षातील आमदार वाचवू शकले नाहीत, आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री वाचवू शकले नाही. स्वतःच्या परिवारातील सख्ख्या भावाचं प्रेम वाचवू शकले नाही. परिवारातील आणि पक्षात काम करणार्या चुलत भावाचा विश्वास संपादन करु शकले नाही. परिवारातील वहिनींचे प्रेम घेउ शकला नाहीत. पक्ष सोडून जाणाऱ्या नगरसेवकांना जवळ ठेवू शकले नाहीत. तुम्ही देश वाचवायच्या काय गोष्टी करता. पहिले घरापासून पक्षापर्यंतची उजळणी करा. मग मोठ्या मोठ्या बाता करा असा आमचा त्यांना मैत्रीचा सल्ला आहे.

नैतिकता, हिंमत आणि मर्द या शब्दांवर उद्धवजींचे प्रेम आहे. तुमचे सुपुत्र आमच्या मतांवर निवडून आले आहेत. नैतिकतेने आमच्या मतांवर त्यांचा विषय झाला आहे. मर्द असाल तर तुमच्या आमदारांना तुमच्या सुपुत्रासह नैतिकता, हिंमत दाखवत राजीनामा द्यायला लावा आणि निवडणुकीला सामोरे जा आणि मग आम्हांला नैतिकतेचे सल्ले द्या असे शेलार म्हणाले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *