कौडीण्यपूर येथील रुख्मिणी मातेच्या पालखीचे जंगी स्वागत….

अमरावती दि ४– महाराष्ट्रातील 431 वर्षाची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुख्मिणीचे माहेरघर असलेले श्री क्षेत्र कौडीण्यपूर येथील माता रुख्मिणीची पालखी आषाढी एकादशी करिता पंढरपूरकडे काल सायंकाळी मार्गस्थ झाली.यावेळी माता रुक्मिणीच्या पालखीचे अमरावती शहरात चार दिवसानंतर आगमन झाले.
अमरावती शहरातील बियाणी चौकात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आलं.यावेळी
ससीमेवर लढणाऱ्या सैनिक व सैनिकाच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला,33 दिवसांचा पायी प्रवास करून पालखी आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहचणार आहे .. यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली, यावेळी अमरावतीकर मोठ्या उत्साहात उपस्थित होते…