नाशिक वैतरणा धरणाचे पाणी पेटले, शेतकरी आक्रमक

नाशिक, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैतरणा धरणाचे पाणी मुकणे धरणात देण्यास विरोध करीत शेतकरी आक्रमक झाले असून जोपर्यंत आमच्या जमिनी परत देत नाही तोपर्यंत पाणी देण्यास विरोध आहे असे म्हणत त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
नाशिक जिल्ह्यात आज पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्याची तयारी करत असताना शेतकऱ्यानी प्रखर विरोध केला असून ते धरणावर ठिय्या मांडून बसले आहेत. शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असून त्यांनी आक्रमक शेतकरी होत काम थांबवले आहे. जोपर्यंत सात बारा नाही तोपर्यंत पाणी देणार नाही असे सांगून धरणावर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यांनी जेवण देखील त्याच ठिकाणी केले, सर्व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाला माघारी परतावे लागले आहे.
ML/ML/SL
18 March 2024