थंडीसाठी विठ्ठलास उबदार कपड्याची कानपट्टी व शाल

 थंडीसाठी विठ्ठलास उबदार कपड्याची कानपट्टी व शाल

पंढरपूर दि १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिवाळ्यामुळे सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण आहे, अशातच पंढरपुरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठुरायाला देखील ऊबदार कानपट्टी बांधण्यास सुरुवात झाली आहे.

परंपरेप्रमाणे कार्तिकी वारी झाल्यानंतर विठ्ठलाच्या मुकुटावर लाल काठाच्या उपरण्याची कानपट्टी बांधण्यात येते. या कानापट्टीतून विठ्ठलाचे थंडीपासून संरक्षण व्हावे अशी भावना आहे त्याचबरोबर अंगावर मखमली शाल देखील पांघरण्यात येते. तर शेजारतीनंतर 120 हातांचे पागोटे बांधण्यात येते.

कार्तिक वारीपासून ते माघ वारी पर्यंत सुमारे तीन महिन्याच्या कालावधीसाठी विठ्ठलाचे थंडीपासून संरक्षण व्हावे. यासाठी शेकडो वर्षापासून पंढरपुरात विठ्ठलाच्या अंगावर शाल आणि डोक्याला कानपट्टी बांधण्याची पद्धत आहे.

विठ्ठलाच्या अनेक परंपरांमध्ये उन्हाळ्यात उन्हाच्या काहीली पासून संरक्षण व्हावे. यासाठी चंदन ऊटी तर हिवाळ्यात शाल आणि कानपट्टी बांधण्यात येते.

ML/KA/SL

16 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *