वर्धा नदी फुगल्याने इरई धरणाचे तीन दरवाजे पुन्हा उघडले

 वर्धा नदी फुगल्याने इरई धरणाचे तीन दरवाजे पुन्हा उघडले

चंद्रपूर दि ११:- वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपुरातून कोरपनाकडे जाणारा गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद झाला. मार्ग बंद होण्याची ही सहावी वेळ आहे. पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याने वर्धा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद झाला. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. चंद्रपुरातील इरई धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटर ने उघडण्यात आल्याने नदी काठावरील गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता वाढली असताना शेती पाण्याखाली येण्याचे संकट अधिक गडद झाले आहे. प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *