राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये थेट सरपंचपदासाठी 28 एप्रिलला मतदान
मुंबई, दि. ११ : राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच बिगुल अखेर वाजलं आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये थेट सरपंचपदासाठी 471 आणि 3120 सदस्य रिक्त जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सध्या गावोगावी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 29 एप्रिल 2026 रोजी होईल.

SL/ML/SL