विधानपरिषदेच्या 6 जागा झाल्या रिक्त, नाराजांपैकी कुणाला संधी?

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालात विधानपरिषदेचे सहा सदस्य निवडून आल्याने विधानपरिषदेत सत्तारूढ पक्षाच्या सहा जागा रिक्त झाल्या असून विधानसभा निवडणुकीत बंडोबांना थंड करण्यासाठी दिलेल्या आश्वासनानुसार आता कोणाला संधी मिळते ते पहायचे
या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. या निवडणूकीत भाजपाने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीने सहा विधानपरिषद सदस्यांना विधानसभेसाठी तिकीट दिले होते ते सगळेच निवडून आले आहेत, त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या सहा नेत्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
विधानपरिषदेतील भाजपाच्या चार जागा रिक्त झाल्या असून
चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, सुरेश धस आणि प्रविण दटके हे भाजपाचे चार नेते विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत ज्या नाराज नेत्यांना डावलण्यात आले होते, त्यांना आता विधानपरिषदेवर संधी दिली जाऊ शकते.
शिंदे, अजित पवार यांच्या प्रत्येकी एक-एक जागा रिक्त झाल्या आहेत, शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांची विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचीही एक जागा विधानपरिषदेत रिक्त होणार आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर हे देखील विधानपरिषदेवर आमदार आहेत मात्र ते विधानसभा निवडणुकतीही विजयी झाले आहेत. परिणामी विधानपरिषदेची त्यांची जागाही रिक्त होणार आहे. या स्थिती नंतर महायुतीचे तिन्ही घटकपक्ष नेमके कोणत्या नाराज नेत्यांना संधी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ML/ML/PGB 25 Nov 2024