वायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा वाढला, ३०८ जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरूच

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा वाढतो आहे. गुरूवारी संध्याकाळपर्यंत 293 जणांचा मृत्यू झाला असून आता 308 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मृतांमध्ये २७ मुले आणि ७६ महिलांचा समावेश आहे. तर 225 हून अधिक जखमी झाले आहेत. बहुतेक जखमी मुंडक्काई आणि चुरलमला येथील सर्वाधिक प्रभावित भागातील आहेत. यासोबतच 200 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. 9000 हून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.
ML/ML/PGB 2 Aug 2024