सलग दुसऱ्या दिवशी
अवकाळी पावसाचे थैमान

वाशीम, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वाशीम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला.या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून,
नागरिकांना गर्मीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.मात्र,या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अवकाळी पावसाचा फटका काढणीस आलेल्या पिकांना बसला आहे. बीजवाई कांदा, हळद,ज्वारी यांसह आंबा बागांना मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावल्या गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्यानं शासनाने या नुकसानीची दखल घेऊन मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ML/ML/PGB 2 April 2025