वंचित बहुजन आघाडीची मंत्रालयावर धडक

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील गायरान धारक व मुंबईतील एसआरए आणि बीडीडी चाळीतील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड .प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.Vanchit Bahujan Aghadi attacked Mantralaya
महाराष्ट्रातील गायरान धारकांवर काढलेल्या नोटिसा तात्काळ मागे घ्या, 1991 च्या जीआरची कालबद्धरित्या अंमलबजावणी करा, 2018 पर्यंतच्या गायरानवरील घरा खालील जमीन नावावर करा,आणि 2019 नंतरच्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत गायरानधारकांच्या स्त्री-पुरुषाच्या नावावर 7/12 करा ,एस आर रे प्रकल्प राबविणाऱ्या बिल्डर ने योग्य ते भाडे द्यावे, रोड, पाईपलाईन व ईतर कटींग मधील झोपडी धारकांना त्याच विभागात चालू असलेल्या एसआरए प्रकल्पामध्ये समाविष्ट करावे,
एसआरएतील बिल्डर वेळेत पुनर्वसन प्रकल्प राबवीत नसतील तर त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे,इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
सर्वांसाठी घरे – 2024 हे धोरण धाब्यावर बसवून महाराष्ट्र राज्यातील 2 लाख 22 हजार पेक्षा अधिक भूमिहीन बेघर शेतमजुर, भटके विमुक्त, आदीवासी, मागास वर्गीय, अनु. जाती-जमातीचे समुदायाला महसूल विभागाने नोटीस बजावल्या आहेत. पुढच्या टप्प्यात उर्वरित अतिक्रमण धारकांना नोटीस देवुन बेघर करण्याचे काम सरकार करीत आहे.
राज्यातील 2,22,153 अतिक्रमण धारक जे कि भूमिहीन – बेघर – शेतमजुर, अनु. जाती-जमाती भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, मायक्रो ओबीसी अश्या वर्गातून येतात त्यांचे न्यायासाठी वंचितने लढाई सुरू केली आहे.कुठल्याही परिस्थिती मध्ये अतिक्रमणे काढू देणार नसल्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
सुरुवातीला भायखळा येथून विधानभवनावर हा मोर्चा जाणार होता मात्र अचानकपणे मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला.नंतर मोर्चा मेट्रो सिनेमाच्या सिग्नल पासून आझाद मैदान – मुंबई महापालिकेच्या दिशेने रवाना झाला.या मोर्चात राज्यातील हजारों गायरान धारक व मुंबईतील एसआरए आणि बीडीडी चाळीतील नागरिक सहभागी झाले होते.
ML/KA/PGB
20 July 2023