वडेट्टीवार यांनी काढले सरकारच्या कारभाराचे वाभाडे…

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात खाद्यतेल , डाळी, पीठ, भाजीपाला अशा सर्वसामान्य माणसाला असणाऱ्या रोजच्या गरजेच्या वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत, त्यांच्यावर महागाईचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे वीज दर वाढ करून सरकारने सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली. राज्यातील वाढती महागाई आणि इतर बाबी या विषयावर विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू करताना ते बोलत होते.
वीज वितरण कंपनीच्या ६८ हजार कोटींची तूट भरून काढण्यासाठी सरकारने ३५ टक्के दर वाढ केली आहे. आपल्या डेपो मधला चांगला कोळसा परस्पर विकून टाकून हजारो कोटी रुपयांची लूट केली आहे, परिणामी वीज निर्मितीत नुकसान झालं आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.
एकीकडे पेन्शन मिळणाऱ्या निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने कामावर हजर करून घेतलं आहे तर दुसरीकडे तरुण प्रशिक्षित बेरोजगार राहिले आहेत. विद्यार्थ्यांना आँनलाईन गेम मध्ये गुंतवले जात आहे, अभिनेते च त्याची जाहिरात करत आहेत यावर बंदी घाला अशी मागणी त्यांनी केली.
अनुसूचित आयोगाला केंद्राने घटनात्मक दर्जा दिला आहे मात्र राज्य सरकारने तो अद्यापि दिलेला नाही. ओबीसी हिताची एकही गोष्ट सरकारने गेल्या वर्षभरात केलेली नाही म्हणूनच हजारो विद्यार्थी आजही वसतिगृहाअभावी दारोदार फिरत आहेत असा आरोप वडेट्टीवार यांनी या चर्चे दरम्यान केला.Vadettiwar took a look at the affairs of the government.
ML/KA/PGB
4 Aug 2023