अवकाळी पावसाचा कहर, 87 जनावरे दगावली, शेतीला बसला फटका…

जालना दि २१:– जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात मागील दहा दिवसांमध्ये 7 जणांसह 87 जनावरे अंगावर वीज पडून दगावली आहेत. तर 1925 हेक्टरवरील शेतीला ही अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार 187 गावातील 2 हजार 645 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. यात 1 हजार 925 हेक्टरवरील शेती बाधित झाली आहे. यात 1 हजार 135 हेक्टर बागायती, तर 790 हेक्टर वरील फळपिकांचा समावेश आहे.