दक्षिण रत्नागिरीला अवकाळी पावसाने झोडपले; आंबा, काजू पिकाचे नुकसान…

रत्नागिरी दि ३:– दक्षिण रत्नागिरीला पहाटे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले. राजापूर तालुक्यात सुद्धा धुंवाधार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू पिकाचे नुकासान झाले आहे. दरम्यान हवामान विभागाने अरबी समुद्रातील बाष्प युक्त वाऱ्यामुळे कोकणाला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज आणि उद्या देखील पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.