पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट

 पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यावर आस्मानी संकटाचे सावट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. गेल्या महिन्याभरापासून अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे राज्याच्या कमीपावसाच्या क्षेत्रातही नद्या-नाले वाहू लागले आहे, काढणीला आलेली पीके धोक्यात नष्ट होत आहेत. त्याच आता हवामान खात्याने या पूर्ण आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातील बहुतांश ठिकाणी येत्या ५ दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा धोका असल्याचे हवामानखात्याने म्हटले आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस संभवत असून वातावरण ढगाळ राहणार आहे.

दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) पुढच्या पाच दिवसांत देशाच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवसात मध्य भारतात ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

SL/KA/SL

1 May 2023


mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *