साहित्य संमेलनाचे सूप वाजले

 साहित्य संमेलनाचे सूप वाजले

वर्धा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा इथे गेले तीन दिवस सुरू असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आज सूप वाजले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारोप समारंभ झाला. Union Minister Nitin Gadkari presided over the closing ceremony.

आपल्या जीवनात साहित्याचे मोठे महत्त्व असून साहित्यामुळे समाज घडतो असे गडकरी यावेळी म्हणाले.जीवन घडवायचे सामर्थ्य साहित्यात आहे, आपण काय विचार करतो यावर विचारांची गुणवत्ता अवलंबून असते असेही त्यांनी सांगितले.

साहित्य संमेलनातील ठराव

साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या वेळी दहा ठराव मंजूर करण्यात आले, राज्यातील कोणत्याही मराठी शाळांचे रूपांतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत करू नये , बृहन्महाराष्ट्र क्षेत्रातील काही मराठी महाविद्यालये बंद पडण्याच्या स्थितीत आहेत त्यांना अनुदान द्यावे. बृहनमहाराष्ट्रातील संस्थांना अनुदान देण्यात यावे.प्रकाशकांना छपाई आणि कागदखर्चात सबसिडी द्यावी आदी ठरावांचा त्यात समावेश आहे.

ML/KA/PGB
5 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *