वालधुनी नदीच्या काठावर अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांची आता गय नाही

कल्याण दि.29( एम एमसी न्यूज नेटवर्क): वालधुनी नदीच्या काठावर अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांची आता महापालिका गय करणार नाही . ज्यांनी या अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारती मध्ये म्हणा किंवा चाळी मध्ये घरे घेतली असतील त्या बांधकामावर कारवाई होणार आहे . नुकताच वालधुनी नदीच्या पुर नियंत्रण रेषेबाबत अहवाल प्राप्त झाला असुन या पुर नियंत्रण रेषेबाबत ची माहीती जलसंपदा विभागा कडुन महापालिका घेणार आहे.
उल्हासनगर शहराच्या मध्यभागातुन वाहणाऱ्या वालधुनी नदीला पुराणिक पांडव कालिन वडवन नदी म्हणत असत, तेव्हा आता वालधुनी नदी म्हणतात. वालधुनी नदीच्या प्रदूषणाबाबतचे प्रकरण एनजीटी, हायकोर्टा मध्ये वनशक्ती संघटने द्वारे दाखल केल्यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने वालधुनी नदी हे नाव शिक्कामोर्तब झाले आहे .
उल्हासनगर महापालिके द्वारे १ मार्च रोजी प्रकाशित केलेल्या नवीन विकास आराखड्यामध्ये वालधुनी ला नदीचा दर्जा देण्यात आला आहे . दरम्यान नदीचा दर्जा दिल्या नंतर शहर विकास आराखड्या मध्ये स्पष्ट म्हटले आहे की वालधुनी नदीच्या काठा पासुन १२ मीटर पर्यंत रिवर बफर व झोन ग्रीन असणार, तेव्हा नदीच्या काठापासुन १२ मीटर पर्यंत कोणते ही बांधकाम होता कामा नये . दरम्यान तशी तर प्रत्येक नदीची पुर रेषा ही रेड लाइन, ब्लु लाइन, ग्रीन लाइन हे नदीचे किनारा मानण्यात येतात.
२००५ मध्ये आलेल्या पुरा नंतर नाशिक येथिल पर्यावरणविद प्रसिद्ध संस्था ” मेरी ” च्या अहवाला अनुसार कल्याण डोंबीवली क्षेत्रा मध्ये वालधुनी नदीचे पात्र ८० मीटर रुंद असायला हवे असुन उल्हासनगर महापालिका क्षेत्रा मध्ये हेच नदीचे पात्र ६० मीटर रुंद असणे आवश्यक आहे . दरम्यान अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रा मध्ये नदीचे पात्र ४० मीटर रुंद करण्याचे मेरी च्या अहवालात नमुद केले आहे . सोबतच खड़ेगोलवली नाला ६० मीटर, शिवनाला ६० मीटर रुंद होणे गरजेचे आहे .दरम्यान
कल्याण डोंबीवली महापालिका क्षेत्रात ४ पुल, उल्हासनगर महापालिका क्षेत्रात ८ पुल आणि अंबरनाथ नपा क्षेत्रात मोठे ८ पुल उभारण्याची गरज असल्याचे मेरीने अहवालात नमुद केले आहे . सदरचा अहवाल शासना कडे दिलेला असुन या अहवालानुसार महापालिकेने वालधुनी नदीच्या काठावर बनलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली तर शेकडो बांधकामे तुटून नदी मोकळा श्वास घेणार आहे.
SW/KA/SL
29 April 2023