धारावीसाठीचा संघर्ष हा मुंबई आणि महाराष्ट्राचा लढा

मुंबई: (११ जून) शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी काल सांगितले की धारावी वाचवण्याचा संघर्ष हा मुंबई आणि महाराष्ट्रासाठीचा लढा आहे. पुनर्विकासाच्या कामात असलेल्या झोपडपट्टीत पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले की त्यांचे पणजोबा केशव उर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि आजोबा बाळ ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला. आदित्य म्हणाले की ते आणि शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आजच्या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढत आहेत.
मुंबईतील धारावी ही जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असून, सुमारे ८–१० लाख लोक अवघ्या ३ चौरस किमी क्षेत्रात राहतात. राजकीयदृष्ट्या धारावीला अनेकदा केवळ “व्होट बँक” म्हणून पाहिलं गेलं. गेल्या दोन दशकांत सहा वेळा पुनर्विकासाचे प्रयत्न झाले, पण प्रत्येक वेळी अडथळे आले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन मास्टर प्लॅन मंजूर झाला असून, धारावीतील रहिवाशांना हक्काची घरे, स्वच्छ रस्ते, शाळा, दवाखाने, बागा यांसह नियोजित वसाहत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. धारावी पुनर्विकासाचे काम अदानी कंपनीकडे आहे. या नुतनीकरणातून खऱ्या धारावीकरांना न्याय मिळणार का? तेथील लघुउद्योग टिकून राहणार का? असे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहे.